अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Science

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे संगणक वापरून उपरोधिक विधाने ओळखण्याच्या विविध मार्गांचा अभ्यास करण्यात आला.

पावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे! हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल! आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस  उर्फ बी.डी.  नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस  नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात.

मुंबई

शहरीकरण आणि वाढत्या शेतीमुळे पाणी झिरपण्याच्या  संरचनेत आणि मृदेच्या हालचालीत बदल झाल्याचे आयआयटी मुंबई येथील अभ्यासातून निदर्शनास आले आहे. 

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी ग्रामीण भागात वापरण्यासाठी कमी खर्चाचे, सोप्या पद्धतीने देखरेख करता येण्यासारखे आर्सेनिक गाळण्याचे संयंत्र विकसित केले आहे.

मुंबई

रुग्णाच्या आरोग्याच्या निर्देशक असलेल्या ईसीजी आणि ईईजीसारख्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी कमी उर्जेवर चालणाऱ्या, कमी किंमतीच्या आणि अंगावर बाळगता येईल अशा बिनतारी उपकरणाची रचना केली आहे.  

मुंबई

सूक्ष्मशैवाल बायोरिफायनेरीमध्ये निर्माण होणार्‍या सह-उत्पादनांची बाजारात असेलली मागणी आणि कार्बन शोषून घेण्याचे प्रमाण याचा रिफायनरीच्या नफ्यावर होणार्‍या परिणामाचे मूल्यांकन आयआयटी मुंबई येथील वैज्ञानिकांनी केले

महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू  लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन  मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.

मुंबई

संशोधकांनी असे वाहक विकसित केले आहे जे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अधिक प्रभावीपणे औषध पोहचवू शकते.

मुंबई

पदार्थांचे रेणू ओळखण्यासाठी आय आय टी मुंबई च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत 

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी सेलफोनच्या स्थानाची अचूकता सुधारण्यासाठी आसपासच्या सेलफोनकडून माहिती मिळवणारे ऍप्लिकेशन विकसित केले आहे

Search Research Matters