अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात. मात्र, तुटक म्हणजेच विखंडित (फ्रॅगमेंटेड) वनक्षेत्रे वनस्पतींचा आणि प्राण्यांचा टिकाव लागण्यात आणि प्राण्यांच्या मुक्त हालचालींमध्ये बाधा आणू शकतात. उदाहरणार्थ, वाघांना शिकार करण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि मनुष्यप्राण्याच्या वाटेत न येता जगण्यासाठी मोठी सलग जंगले जास्त गरजेची असतात.

Science

मुंबई

अनेक अणू एकत्र येऊन रेणू तयार होताना अणूंची त्या रेणूमधली मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने होऊन त्याच्या वेगळ्या रचना तयार होऊ शकतात. अश्या रचनांना समसूत्री(आयसोमर/isomer) म्हणतात. काही समसूत्रींतील अणूंच्या रचना एकमेकांचे आरशातले प्रतिबिंब असतात. जसे दोन हात एकमेकांवर ठेवल्यास तंतोतंत जुळत नाहीत, तश्याच ह्या रचना एकमेकांवर ठेवल्यास जुळत नाहीत. अशा रेणूंना हस्तसम (कायरल/ chiral) रेणू म्हणतात. हस्तसम रेणूची एक रचना औषधी असू शकते तर दुसरी शरीराला हानिकारक. पेनिसिलिनचा रेणू याचे उत्तम उदाहरण आहे.

Mumbai

पेशीच्या आतमध्ये आणि रक्तप्रवाहात मेद वाहून नेणारे काही विशिष्ट रेणू नवीन संशोधनातून पुढे आले आहेत.

मुंबई

फळबागांसाठी बांधलेल्या आणि प्लॅस्टिक लावलेल्या शेततळ्यांच्या सामाजिक परिणामाचा आढावा 

मुंबई

वेगाने बदलणार्‍या क्षीण चुंबकीय क्षेत्राच्या प्रतिमा तयार करण्यासाठी हिऱ्यामधील पुंज दोषांचा वापर 

मुंबई

अतिसूक्ष्म प्लॅस्टिक प्रदूषक कणांचे अस्तित्व तपासण्यासाठी मायक्रोवेव्ह्सचा वापर करणारी नवी पद्धत संशोधकांनी शोधली

मुंबई

संशोधकांनी ग्राफीन आणि अल्फा मॉलिब्डेनम ट्रायऑक्साइडच्या मिश्रणाचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित क्वांटम सर्किट तयार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

मुम्बई

जखम लवकर भरून येण्यासाठी नैसर्गिक औषधे आणि पॉलिमरच्या द्विस्तरीय रचनेतून त्वचेवर चिकटवता येईल असा पॅच संशोधकांनी तयार केला

मुंबई

पुंज (क्वांटम) पदार्थ आधारित वॅलीट्रॉनिक्स उपकरणांसाठी सध्याचे उत्पादन तंत्रज्ञान उपयोगात आणू शकणारी नवीन रचना

मुम्बई

वासाचा रेण्वीय कंपनांशी संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

मुम्बई

शारीरिक वेदना अनुभवत असलेले विद्यार्थी कोणतीही वेदना होत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खराब कामगिरी करतात आणि त्यांची मनःस्थितीही जास्त खालावलेली असते. 

Search Research Matters