१९७५ ते २०१४ या कालखंडातील माहितीच्या विश्लेषणातून आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील गेल्या ४० वर्षातील तीन टप्प्यांमधील बदलांचा मागोवा घेतला आणि त्यात असे दिसून आले की भारतातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधातील कृषी उत्पादनक्षमता शेतजमिनीच्या आकारापेक्षा आवश्यक संसाधनाची उपलब्धता, पत किंवा कर्ज आणि बाजारपेठा या घटकांवर अवलंबून आहे.